विज्ञान - तंत्रज्ञान

जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ डॉ जयंत नारळीकर यांचे निधन

वयाच्या ८६ व्या वर्षी पुण्यात घेतला शेवटचा श्वास


पुणे (प्रतिनिधी ) प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 86 व्या वर्षी जयंत नारळीकर यांनी जगाचा निरोप घेतला. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे


प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, लेखक आणि विज्ञानप्रसारक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. नारळीकर झोपेतच अनंतात विलीन झाले. त्यांना कोणतीही दीर्घ आजारपण नव्हते. दोनच वर्षांपूर्वी त्यांच्या सुविद्य पत्नी आणि गणितज्ज्ञ मंगला नारळीकर यांचे निधन झाले.डॉ. जयंत नारळीकर याचा जन्म कोल्हापूर येथे 19 जुलै 1938 रोजी झाला. त्यांचे वडील, रॅंग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ होते. वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित शाखेचे ते प्रमुख होते. त्यांच्या मातोश्री सुमती विष्णू नारळीकर या संस्कृत विदुषी होत्या. जयंत नारळीकर यांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात गेले.आयुका संस्थेची स्थापना
खगोलशास्त्रातील त्यांच्या संशोधनामुळे त्यांना जगभरात मान्यता मिळाली. प्रसिद्ध ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्यासोबत त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पांवर काम केले. पुण्यातील ‘इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोनॉमी अ‍ॅण्ड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (आयुका) या संस्थेची स्थापना त्यांनी 1988 मध्ये केली आणि त्याचे पहिले संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.

नारळीकर हे वैज्ञानिक प्रचारक होते…
डॉ. जयंत नारळीकर हे लेखक आणि विज्ञानप्रसारकही होते. त्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतून अनेक विज्ञानकथा, लघुनिबंध, पुस्तके अशा विपुल साहित्य संपदा लिहिली. नाशिक येथे 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद जयंत नारळीकर यांना प्रदान करण्यात आले होते. जयंत नारळीकर यांना त्यांच्या योगदानाबद्दल पद्मविभूषण, पद्मभूषण या भारतीय नागरी सन्मानांसह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button