
पिंपरी (प्रतिनिधी) आकुर्डी येथील डॉ. डी. वाय पाटील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. शिल्पा चौधरी यांनी वाटसावित्रीचा सण, निसर्ग आणि मानवी जीवनाशी कसे निगडित आहे यावर मार्गदर्शन केले.
वटपौर्णिमा म्हणजे वटसावित्री व्रत, हे विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी साजरा करतात.
ह्या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात, कारण वडाच्या झाडामध्ये भगवान विष्णू, शिव आणि ब्रह्मा यांचा वास असतो, असे मानले जाते.
वडाच्या झाडाला (फायकस बेंगालेन्सिस) आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. त्याची साल, पाने, चीक आणि पारंब्या विविध आजारावर उपाय म्हणून वापरले जातात. वडाची साल ही वेदनाशामक आहे,ते जखमा बरी करण्यास मदत करतात आणि पारंब्या पासून बनवलेले तेल केशवर्धक म्हणून वापरले जातात.
वडाला प्रदक्षिणा घालण्याचा विधी हा त्याच्या पवित्र दर्जाचा फक्त सन्मान करत नाही तर सामुदायिक बंधन वाढवण्यास मदत करतो.
या सणाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विवाहित महिला कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन वटपौर्णिमेचा सण साजरा केला.