शैक्षणिक

शेतकऱ्यांचे दुःख मोजण्यासाठी मोजमाप नाही – देशमाने

डॉ अरविंद तेलंग महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पिंपरी (प्रतिनिधी) कृषीप्रधान देशात सूर्याची लांबी-रुंदी मोजता येते. पण शेतकऱ्यांचे दुःख मोजता येत नाही, ही शोकांतिका आहे. मात्र आपल्या घासातील घास दुसऱ्याला देण्याची वृत्ती जेव्हा येईल तेव्हा आपला समाज खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला, असे म्हणता येईल.असे प्रतिपादन स्नेहवनचे अध्यक्ष अशोक देशमाने यांनी व्यक्त केले.
निगडी येथील डॉ अरविंद ब. तेलंग कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने डॉ अरविंद तेलंग स्मृती करंडक आंतर महाविद्यालय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन कारण्यात आले होते.या स्पर्धेच्या उदघाटन प्रसगी ते बोलत होते.
यावेळी कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती, संचालक डॉ मिलिंद तेलंग, डॉ प्रवदा तेलंग, परीक्षक प्रा.प्रदीप कदम, शांताराम वाघ, प्राचार्य प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत प्रथम कमांक कु. अगवणे सुग्रीव बालाजी आणि कु. खडके साक्षी सुरेश (कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, वाकड) यांनी प्रथम कमांक मिळविला. व्दितीय क्रमांक विभागून देण्यात आला. कु तनिष्का घोवळे व कु. अरणे रोहिणी पोपट आणि अरणे ऋतूजा पोपट व पिंपळे वैष्णवी (डॉ. अरविंद व तेलंग वरिष्ठ महाविद्यालय, निगडी) यांनी व्दितीय कमांक मिळविला,तर तृतीय कमांक कु. दातखिळे शुभम व कु. मोरे रामेश्वर, (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थ बक्षीस कु. हत्तीकर स्नेहल व कु. पवार अंजली (एटीएस एस महाविद्यालय) यांना देण्यात आले.
पारितोषिक वितरण पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपायुक्त मा. पंकज पाटील, प्राचार्य डॉ. प्रकाश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी लायन्स क्लब गॅलक्सीच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याची जबाबदारी डॉ. विक्रम शेवाळे यांनी पार पाडली. प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब सोनवणे यांनी केले पाहुण्यांची ओळख पा. तुषार भोसले व प्रा. भाग्यश्री मोरे यांनी करून दिली.

तर आभार प्रदर्शन प्रा .डॉ दत्तात्रय खुणे यांनी केले. या कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा ज्योती वाणी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button