कामगार

न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्राने घरेलू कामगार कायदा करावा – नखाते

घरेलु कामगार मेळाव्यात श्रम प्रतिष्ठा पुरस्काराचे वितरण

पिंपरी दि.१६ – महाराष्ट्र सह देशभरामध्ये काम करणाऱ्या घरेलू कामगारांचे कामगारांचे जीवन असुरक्षित त्यांच्या कामाला कायदेशीर हक्क अधिकार प्राप्त होत नाहीत, त्याचबरोबर घरेलू कामगार महिलांचे आरोग्याचे प्रश्न,अपघाती विमा यासह किमान वेतन व पिळवणूक टाळण्यासाठी कायदा होणे महत्त्वाचा आहे म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने २९ जानेवारी रोजी घरेलू कामगारांचा केंद्रीय कायदा करावा असे आदेश केंद्र सरकारला दिले मात्र आता ५ महिने झाले सरकार चालढकल करत असून हा कायदा त्वरित मंजूर करून घरेलू कामगारांना सुरक्षा द्यावी यासाठी लढण्याचा निश्चय सूर घरेलू कामगार दिनानिमित्त आयोजित घरेलू कामगार मेळाव्यात एकमुखाने करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ, घरेलू कामगार विभाग यांच्याकडून आज पिंपरी चिंचवड येथील थरमॅक्स चौक येथे संघटनेच्या प्रांगणामध्ये घरेलू कामगार मेळावा व घरेलू कामगारांना श्रम प्रतिष्ठा पुरस्कार वितरण तसेच घरेलू कामगारांच्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.
कष्टकरी महिलांचे हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच कष्टकरी कामगारांचे गीत गाऊन या मेळाव्याची सुरुवात झाली.

यावेळी कामगार नेते तथा महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते,
समाज प्रबोधनकार शारदाताई मुंडे, महिलाअध्यक्षा माधुरी जलमुलवार, इंदुबाई वाकचौरे,मुमताज शेख, नंदा जाधव, माया शेटे, महानंदा घळगे, प्रियांका काटे, सुमन क्षीरसागर,सुनिता देवतरसे,कौशल्य खताळ,सुगंधा चव्हाण,सुमन कांबळे,
मालन गोरे,विमल वाघोले,पूजा कांबळे,सुषमा नेटके,छाया बनसोडे,
मनीषा शेलार,पार्वती भिसे,रेश्मा चव्हाण,मनीषा मेहंदळे,आशा अडसूळ ,राजश्री चव्हाण
सरस्वती गरड आदी उपस्थित होते.

अनेक वर्षापासून घरकाम करून आपल्या कुटुंबाला प्रगतीपथावर नेणाऱ्या सरस्वती प्रधान, राणी ठोकळ, राधाबाई ताकतोडे, विजया पाटील यांना घरेलू कामगार श्रम प्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी म्हणून राणी नायडू , मयुरी उघडे, श्रद्धा वाघोले, रिद्धी खरात,जैनब पठाण, हर्षिता कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला .

यावेळी नखाते म्हणाले की देशातल्या कोट्यावधी घरेलू कामगारांची हाक माननीय सर्वोच्च न्यायालयाने ऐकली आता केंद्राला आदेश दिले मात्र केंद्र सरकार याबाबत ६ महिने होत आले तरी पावले उचलल्याचे दिसत नाही असे झाल्यास सरकारच्या विरोधामध्ये अवमान याचिका सुद्धा दाखल करावी लागणार आहे . घरेलू कामगार हा महत्त्वाचा घटक त्यांच्या महामंडळाला आर्थिक निधी सह मंडळ पुनर्जीवित करून त्यांना लाभ देणे व नवीन कायद्यासाठी आणि त्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .महाराष्ट्र सरकारनेही याबाबत तातडीने बैठक बोलावणे गरजेचे आहे.
शारदाताई मुंडे म्हणाल्या की जिजाऊ, सावित्री, रमाई आणि अहिल्या यांची रूपे आज सर्व कामगारांमध्ये दिसत असून घरेलू कामगार हा आघाडीवर आहे, पिंपरी चिंचवड शहरातील कामगारांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघ आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे . घरेलू कामगारांनी प्रत्येक लढाईत सहभागी व्हावे, गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सन्मान होत असला तरी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांना विसरू नये त्यांची सेवा करावी मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिलांनी काबाड कष्ट केलेले विसरू नये.
जलमूलवार म्हणाल्या की कामगारांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात असून त्यांना आरोग्याचा विमा मिळावा तसेच जिल्हा पातळीवर त्रिपक्ष समितीची स्थापना व्हावी . आणि त्यानुसार त्यांना लाभ मिळावा.
सूत्रसंचालन सरिता इंगळे तर आभार अश्विनी मालुसरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button