
आकुर्डीः (प्रतिनिधी)आपले पारंपारिक उर्जास्त्रोत हे संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे नव उद्योजकांनी आता उर्जा निर्माण करण्यासाठी पुढे येणे काळाची गरज आहे. वातावरणातील बदल लक्षात घेता शाश्वत विकासासाठी ज्या गोष्टी करणे गरजेचे आहे. अशा क्षेत्रांमध्ये काम करणे गरजेचे आहे. उदा. पुण्यासारख्या एक कोटी लोकसंख्या असणा-या शहरामध्ये प्रचंड ओला आणि सुका कचरा गोळा होतो, त्याच्यातून काही नविन उर्जा तयार करता येईल का यावरती नव उद्योजकांनी व्यवसाय केल्यास एक प्रकारे शाश्वत विकासाचा नविन पायंडा पडेल. आत्ताच्या घडीला पाण्यामधील जीवसृष्टी ही शेवटच्या घटका मोजत आहे, कारण आपण नदीमध्ये अनेक रासायनिक पदार्थ सोडत आहोत व त्यामुळे त्याचा फटका पाण्यामधील जीवसृष्टीला बसत आहे. यावरतीही काम करण्यास नव उद्योजकांनी करावे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ पराग काळकर यांनी केले.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटयूट ऑफ मास्टर्स ऑफ कॉम्प्यूटर अॅप्लीकेशन अॅण्ड मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०७ आणि ०८ मार्च, २०२५ रोजी दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद डॉ. डी. वाय. पाटील ऐज्युकेशन कॉम्प्लेक्सच्या शांताई सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती.यावेळी ते परिषदेच्या सांगता प्रसंगी तें बोलत होते.
आंतरराष्ट्रीय परिषदेचा सांगता समारंभ दिनांक ०८ मार्च, २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर . अमर शेठिया, व्यवस्थापकीय संचालक, टी.सी.एस. कंपणी हे सन्मानीय पाहुणे म्हणून उपस्थित होते, याशिवाय प्राध्यापक डॉ. विजय खरे हे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कौन्सिल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देखील उपस्थित होते, याशिवाय संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका (क्वॉलिट अॅश्युरंस), डॉ. श्वेता चव्हाण पाटील, डॉ. जयसिंह पाटील, संचालक, डी. वाय.पी.ई.आर.एफ., डॉ. निर्मला के., संचालिका, डी.वा.पी.आय.एम.सी.ए. अॅण्ड एम. आणि प्रभारी संचालक डी.वाय .पी.आय.एम.एस. डॉ. ललित प्रसाद हे उपस्थित होते.
श्री. अमर शेठिया यांनी आपल्या भाषणात सांगितले की, शाश्वत विकास हा वेष्ट मॅनेजमेंट पासून चालू केला पाहिजे, की ज्यामधून नविन विद्युत उर्जा निर्माण केली पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये देखील सेंद्रीय शेतीचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरुन रासायनिक खतांचा वापर टाळून शेती उत्पादन घेतले पाहिजे, प्रत्येक उद्योजकाने पर्यावरण पुरक ग्राहकोपयोगी वस्तू बनविल्या पाहिजेत.
डॉ. जयसिंह पाटील म्हणाले की, आपण छोटया छोटया गोष्टींमधून पर्यावरणाची हानी टाळू शकतो. उदा. विजेची बचत प्लास्टीकचा वापर टाळणे, आदी गोष्टी या दैनंदिन जिवनात केल्या तरीदेखील शाश्वत विकासास हातभार लागेल.
डॉ. विजय खरे म्हणाले की, इस्राईल हा देश पुढील पाच वर्षांमध्ये प्रोटिनच्या गोळ्या तयार करून विकणार आहे. म्हणजेच आपल्या भारतातील पोल्ट्री व्यवसाय हा अडचणीत येउ शकतो. तर आपण स्थानिक गरजांचा विचार करून जागतिक बाजारपेठेत आपल्या वस्तू कशा विकता येतील याचा नव उद्योजकांनी विचार करून नविन व्यवसाय सुरु करावेत.
या परिषदेमध्ये सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाच्या पारितोषिकांचे मान्यवरांचे हस्ते वितरण करण्यात आले. फायनांन्स मध्ये डॉ. गणेश लांडे, प्रा. महेश महंकाल, डॉ. विद्या भांडवलकर, प्रा. प्रतिक वडगांवकर, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये प्रा. वैशाली बारसे, डॉ. कविता सुर्यवंशी, ह्युमन रिसॉर्स मॅनेजमेंटमध्ये प्रा. शिल्पा कुलकर्णी व डॉ. एम. एम. मुनसी, मार्केटिंगमध्ये प्रा. मेघश्याम चौधरी, डॉ. मिनल पेंडसे, डॉ. रोहन दास, जनरल मॅनेजमेंटमध्ये रोहीत मल्होत्रा आणि ऑपरेशन मॅनेजमेंटमध्ये शैलेश नातू है सर्वोत्कृष्ट शोधनिबंधाच्या पारितोषिकांचे मानकरी ठरले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. राणी थॉमस आणि प्रा. मिनल वाघ यांनी केले तर आभार डॉ. कविता सुर्यवंशी यांनी मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. भरत पाटील, व्यवस्थापकीय संचालिका सुप्रिया चव्हाण पाटील, व्यवस्थापकीय संचालिका (क्वॉलिट अॅश्युरंस), डॉ. श्वेता चव्हाण पाटील, डॉ. जयसिंह पाटील, प्रा. डी. आर. करनुरे यांचे बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.